पूर्व विदर्भ

वर्धा जिल्हा विदर्भात आघाडीवर,वर्धा जिल्ह्यात दहावीचा निकाल 99.95 टक्के

महाराष्ट्र बोर्डाने आज 10विचा निकाल जाहीर केला,माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा नागपूर बोर्डाच्या दहावीच्या निकालात वर्धा जिल्ह्याने 99.95 टक्के निकाल देऊन विदर्भात शैक्षणीक क्षेत्रात आपली आघाडी प्रस्थापीत केली. यात 99.96 टक्के मुलं, तर 99.94 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या. विशेष म्हणजे केवळ सात विद्यार्थ्याच्या नशिबी अनुत्तीर्णतेचा ठपका लागला आहे. जिल्ह्यात गेल्या काही वर्षात मुलींचीच आघाडी होती हे उल्लेखनिय.

जिल्ह्याचा निकाल 2018 मध्ये 83.64 टक्के होता. 2017 मध्ये 80.12 टक्के, 2016 मध्ये 82.30 टक्के तर 2015 मध्ये 85.85 टक्के निकाल लागला होता. 2019 मध्ये दहावीच्या परीक्षाच झाल्या नसल्याने ते विद्यार्थी कोरोनाच्या बॅच चे ठरले. जिल्ह्यातील आठही तालुक्यातून 285 ंशाळांमधून 16 हजार 368 विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या परीक्षेचे अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 16 हजार 368 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी 16 हजार 361 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांच्या उत्तीर्ण होण्याची सरासरी 99.95 टक्के आहे. वर्धा जिल्ह्यात 16 हजार 368 विद्यार्थ्यामध्ये 8 हजार 523 मुलं तर 7 हजार 845 मुलींनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. तेवढेच विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 8 हजार 520 मुलं तर 7 हजार 741 मुली असे एकुण 16 हजार 361 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात प्राविण्य श्रेणीत 6 हजार 378 , प्रथम श्रेणीत 7 हजार 926, तर 70 विद्यार्थी निव्वळ उत्तीर्ण झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!