नागपूर

पाहुणे ,पुरणपोळी,आंब्याचा रसाचा बेत आणि 6 लोकांची मृत्यूशी झुंज

नागपूर जिल्ह्यातील परसोडी राऊत येथे पाहुणचार करणे कुटुंबाच्या जीवावर बेतले ,पुरणपोळी खाल्यानंतर पाहुण्यांसह एकाच कुटुंबातील सहा व्यक्तींना विष बाधा झाली

पाहुणे करीता कुटुंबाने पूरण पोळी बनविली आणि सर्वांनी त्या पूरण पोळी खाल्या त्य नंतर एकाच घरातील 6 जणांना आलेल्या व पोट दुःखी जाणवू लागली ही बाब ग्रामस्थांना कळली परिस्थिती गांभीर्य ओळखून विषबाधा झालेल्या ना लगेच ग्रामीण रुग्णालय येथे आणुन भरती करण्यात आले

विषबाधा झालेल्या मध्ये गंगाधर दुर्वे यांच्या कुटुंबातील त्याचा मुलगा अंकुश गंगाधर दुर्वे वय 30,सुन सीमा अंकुश दुर्वे वय 26 ,बाळ भाविका अंकुश दुर्वे वय 3 वर्ष, अलकेश अंकुश दुर्वे वय 11,सहीने मुलीकडे पाहुणे म्हणून आलेले नातु वेदाश बबलु उईके वय 11 वर्ष, सुमीत बबलु उईके वय 5 वर्ष यांचा संबंधीत आहे त्याच्या वर ग्रामीण रुग्णालय येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर सर्वांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना तातडीने मेडिकल नागपूर येथे पाठविण्यात आले.

विषबाधा आंब्याच्या रसामुळे झाली कि पुरण पोळी मुळें दिगंगाधराव यांच्या घरी पाहुण्यांना रसाच्या पाहूनचार होता त्याच बरोबर आज सकाळी त्यांना शिजवून ठेवलेले पुरणाचा पोळ्या सुध्दा खाण्यात आल्या रात्री उरलेल्या रस सकाळी खाल्ल्यामुळे वरील सर्वांना उलटी ,तोंडांत फेस व पोट दुःखी जाणवू लागली होती व त्यांची तब्येत खालावत गेली त्यामुळे नेमकी विषबाधा कश्यामुळे झाली हे कळु शकले नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!