
महाराष्ट्र
महाराष्ट्रात शाळा कॉलेज 15 जुलैपर्यंत बंदच राहणार: दिलीप वळसे पाटील
शाळा आणि कॉलेज संदर्भात बोलताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मोठे विधान केले आहे,त्यांनी सांगितले की 15 जुलैपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री याबाबतचा निर्णय घेतील. लसीकरणाला गती मिळाली आहे, त्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे.
तिसरी लाट ही चिंतेची बाब आहे. तिसऱ्या लाटेचा धोका आहेच. त्यामुळे नागरिकांनी जबाबदारीने भूमिका घ्यावी. बाहेर पडू नये, पर्यटनाला जाऊ नये, तिसऱ्या लाटेत लहान मुलं जास्त बाधित होऊ शकतील असा अंदाज आहे, असं मत वळसे पाटलांनी व्यक्त केलं.