Breaking News

महाराष्ट्रातील 18 जिल्हे पूर्णतः अनलॉक होणार ,जाणून घ्या कोणते आहे जिल्हे,सर्व दुकाने उघडणार

महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना महाराष्ट्र अनलॉक चा प्लॅन तयार झाला असून 5 टप्यात हे अनलॉक होणार असून पहिल्या टप्प्यात 18 जिल्हे पूर्णतः अनलॉक होणार आहे अशी माहिती मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली

पहीला टप्पा – ५ टक्के पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन २५ टक्के बेड आत आहे तिथ लांकडाऊन राहणार नाही. मॉल्स हॉटेल्स दुकाणे वेळेचे बंधन नाही.

पहिल्या टप्प्यात क्रीडांगण, खासगी आणि शासकीय कार्यालय पूर्ण सुरू होतील, चित्रपट गृह सुरू होतील.

जिम, सलून सुरू राहणार

बस 100 टक्के क्षमतेने

आंतरजिल्हा प्रवास मुभा राहणार

ई कॉमर्स सेवा सुरू राहणार

गार्डन, वॉकिंग ट्रॅकला परवानगी

थिएटर सुरू होणार

चित्रपट शूटिंगला परवानगी

पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांत जमावबंदी नाही

अनलॉक होणारे हे असतील 18 जिल्हे

भंडारा,बुलढाणा,चंद्रपूर,धुळे,गडचिरौली,गोंदिया,वर्धा,जालना

औरंगाबाद,लातूर,नागपूर,नांदेड,नाशिक,परभणी,ठाणे,

वाशीम,यवतमाळ,जळगाव

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!