महाराष्ट्र

महाराष्ट्र सरकारचा निर्णय ! दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनंच होणार

महाराष्ट्र दिनांक 3 फरवरी (प्रतिनिधी)

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्यावतीनं दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात येणार आहे. प्रात्याक्षिक परीक्षा दोन कालावधीत घेण्यात येणार आहे.

दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनंच होणार हे आता निश्चित झालं आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतचं परीक्षा देता येणार आहे. मुख्याध्यापक, विषयतज्ञ यांच्याशी चर्चा करून निश्चित करण्यात आले आहेत. दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे.

 

बारावीची परीक्षा 4 मार्चपासून

बारावीच्या परीक्षा  4 मार्च ते 30 मार्च या कालावधीत घेण्यात येतील. प्रात्यक्षिक परीक्षा त्याच वेळेत 14 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत.

अपरिहार्य कारण असेल तर विद्यार्थ्यांना एक संधी देण्यात येईल. दुसऱ्या टप्प्यातील प्रात्याक्षिक परीक्षा 31 मार्च ते 18 एप्रिल या दरम्यान घेण्यात येईल. पुर्वी ठरलेल्या पद्धतीनेच परीक्षा होतील, असं शरद गोसावी यांनी सांगितलं. बारावीसाठी 14 लाख 52 हजार विद्यार्थ्यांनी अर्ज भरलेत. बारावीसाठी 158 विषय आहे.

 

दहावीची परीक्षा 15 मार्चपासून सुरु

दहावीची परीक्षा ही 1 मार्च ला होत असते मात्र या वर्षी आपण 15 मार्चलाच घेण्याचं आधीचं ठरवली होते.  किमान 40 टक्के अभ्यासक्रमावर प्रात्यक्षिक परीक्षा होणार आहे. दहावीसाठी प्रात्यक्षिक परीक्षा ही 40 टक्के अभ्यासक्रमावर आधारित केली आहे.  बहिस्थ परीक्षक न नेमता त्याच शाळेतील परीक्षक नेमला जाईल. प्रत्येक केंद्रावर एक विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे. ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीने योग्य वेळेतचं केली जाईल, असं शरद गोसावी म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!